09.09.2017
ट्रेक म्हटली अनियमित Time Table आणि कधी काय करावे लागेल हे सांगता येत नाही. मला झोप खुप प्यारी आहे पण पर्वत प्रेम एवढे वाढलेय की झोपेचे खोबरे झाले तरी त्याचं दुखः न करता त्याच्या गोड वड्या कशा करता येईल ते बघतो. थोडक्यात काय? ट्रेक म्हटली की सगळ्या गोष्टींसाठी तडजोड करावी लागते. ट्रेक्सचे फोटो फेसबूकवर अपलोड झाले की 'अरे, काय यार? मला सांगायचस ना. मी आलो असतो ट्रेकला. एकटा एकटा फीर.' अशा Comments यायला लागतात. ट्रेक साठी काय काय करावे लागते त्या ट्रेकर्स ना माहीत.
मी घरातून शनिवारी रात्री 11.35 ला निघालो.सगळ्यांना कांजूरमार्गला जमायचे होते. बरोबर 1.15 वाजता कांजूरला पोचलो. तिथून बसने पुण्याकडे प्रस्थान केले. यावेळी 18 जणांचा ग्रुप होता. 18 जणांमध्ये मी, अंकुश, गणेश, अविनाश, स्वागत, रूपेश, कुलदीप, विलास, इशान, रितेश नितेश, हर्शद , विक्रम , आकाश, सचिन, रोहन, प्रदीप इतक्या जणांचा समावेश होता. बस मध्ये बसल्यावर झोपेची आराधना करायला लागलो. ट्रेकला निघालो की ती अशीच रूसून बसते. मग मनवणी शिवाय पर्याय नसतो. काही केल्या झोप येत नव्हती. बस सुसाट पुण्याच्या दिशेने चालली होती.
आम्ही बरोबर 6.30 वाजता राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात पोचलो. फ्रेश होवून गरम गरम चहा पोह्याचा नाष्टा करून 7.20 ला ट्रेक सुरूवात केली. साधारणपणे राजगडाच्या 'चोर दरवाजात' पोहचायला 2 तास लागतात. पण आम्हाला साडेतीन तास लागले. मोठा ग्रुप असला की सगळ्याना सोबत घेवून ट्रेक करावी लागते. पायथ्यापासून 90% चढाई आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केली. 10 चढाई ही धोकादायक होती. निमुळती वाट त्यात लोखंडी सळ्यांचा आधार घेवून चढाव्या लागणाऱ्या निसर्गनिर्मित पायऱ्या काही मोठ्या, काही छोट्या, कमी अधिक उंचीच्या आव्हानात्मक होत्या. तेही पार करून चोर दरवाजा गाठला. चोर दरवाजातून जेमतेम एक माणूस आत जाईल एवढी जागा होती.
चोर दरवाज्यातून आत आल्यावर खऱ्या अर्थाने राजगडावर पाऊल पडले. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीवर आम्ही दाखल झाले होतो. तिथूनच समोरच लांबवर दिसणारा बालेकिल्ल्याचा सुळका अभेद्धतेची खात्री पटवून देत होता. आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परीसर त्यात लाल पिवळी रानफुले सौंदर्यात भर टाकत होती. मी जेवढे डोळ्यात साठवता येईल तेवढे साठवत होतो. किल्ल्याचे हजारो वर्षापूर्वी केलेले बांधकाम अजूनही तसेच होते. पदमावती तलावातील पाणी असो वा चौकोनी विहीरीतील पाणी आपला नितळापणा काही सोडत नव्हते. किल्यावर बऱ्याच ठीकाणी अशा पाण्याच्या सुविधा आहेत. थोडे पुढे चालत गेल्यावर पदमावती मंदीराच्या समोर सईबाईची समाधी पाहावयास मिळली. तिथे असलेल्या पारऱ्या चढून आम्ही बालेकिल्या कडे जाउ लागलो पण अगोदर डाव्या बाजूला असलेली सुवेळा माची, हत्तीचा कडा आणि चिलखती बुरूज पाहायचे ठरवले. उजव्या बाजूला संजीवनी माचीकडे जायला वाट होती. शिवाय जवळच पाली दरवाजा आहे जिथून काही ट्रेकर्स चढाई करतात.
१५ ते २० मिनिटे चालल्यानंतर सर्व प्रथम चिलखती बुरूज लागतो. चिलखती बुरूजावरून समोरच्या दिशेला लांबलचक दिसणारी सुवेळा माची आणि दुरवर पसरलेला वेळवंडी नदीवरील भाटघर डँम दिसतो. किल्ल्याच्या तटबंदीला ठीकठीकाणी लहान दरवाजे (चोरवाटा) बांधलेले आहेत पण त्या छोट्याशा दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी समोर मात्र दरीशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. चिलखती बुरूजाच्या खालच्या अंगाला एका भला मोठा हत्तीच्या आकाराचा खडक आहे आणि मधोमध भले मोठे छिद्र. त्या छिद्रात चार ते पाच माणसे चढून बसू शकतात एवढी जागा आहे. सुवेळा माचीकडून हा कडा हत्तीच्या आकाराचा दिसतो.
हे सगळे डोळ्यात साठवून परत मागे फिरलो. मागे फिरल्यावर डाव्या बाजूला दूरवर संजीवनी माचीचे दर्शन होते. समोरच बालेकिल्ल्याला जायला एक शॉर्टकर्ट वाट आहे. ती वाट आम्ही पकडली. थोडीशी जंगली झाडाझुडपानी व्यापलेली वाट सहज कोणाच्या लक्षात येत नाही.10 मिनटाच्या बिकट वाटेच्या चढाई नंतर गर्द झाडीत घूसलो आणि समोर पाहतो तर निसर्गनिर्मित खडकांची काटकोनापेक्षाही कमी अंशाची चढण. एवढ्या ट्रेक केल्या मी पण त्यावेळी अंगावर सरकन काटा आला. थंड वातावरणात पण घाम फुटला. मी माघार घ्यायची ठरवले. पण एका मित्राने ती चढाई कशी सोपी आहे हे करून दाखवले. भीतीवर मात करायची असेल तर त्या भीतीलाच कवटाळा. तसेच केले. देवाचे नाव घेवून चढाईला सुरूवात केली. माझे एक एक पाउल निर्णाक ठरत होते. 15 मिनिटे अशी चढाई करून आम्ही 18 जणांपैकी 9 जण हा बालेकील्ला चढून गेलो. आमच्यापैकी बाकीच्यानी अगोदरच माघार घेतली होती. बालेकील्ल्याचा दरवाजा आणि त्याचे बांधकाम विचार करायला लावणारे होते. अजूनही उन ,वारा, पाऊस झेलत जशाचे तसे होते. असे काही पाहीले की सगळा क्षीण निघून जायचा. मनाला एक वेगळीच उभारी यायची. बालेकील्ल्यावर इतिहासकालीन 'सदर' , 'राजवाड्याचे अवशेष' आणि इतक्या उंची वर असणारा नितांत सुंदर छोटा तलाव पाहावयास मिळाला. तिथेच बसून आमच्या शिदोऱ्या सोडल्या आणि तोडांत काहीच घास गेले असतील इतक्यात 15 ते 20 माकडांची गँग आमच्या दिशेने यायला लागली. सारे गुंडाळून तिथून पळावे लागले. पण आमच्यापैकी एकजण त्यांच्या ताबडीत सापडला. मोठा गमतीदार आणि तितकाच धोकादायक प्रसंग होता. त्याने आपल्या जवळचा बिस्कीटचा फेकून घेरावातून सोडवणूक केली. काही वेळ मर्कट लिला पाहून खुप मजा आली. आजूबाजूचा परीसर खुप छान होता. सिंहगडाचे पुसटसे दर्शन होत होते. तसेच बालेकिल्ल्यावरून दिसणारा तोरणा पाहून मनात पुढचा बेत तयार होत होता. आठवणींचे गाठोडे मानाशी ठेवून बालेकिल्लाउतरायला सुरूवात गेली.
काही वेळातच आम्ही चोर दरवाज्याच्या इथे पोहोचलो. आमचे बाकीचे मेंबर्स आमचीच वाट पाहत बसले होते. काही वेळ विश्रांती घेवून राजगड उतरायला सुरूवात केली. तासाभराने 3.15 वाजता पायथा गाठला. सगळे मेंबर्स येईपर्यंत तिथून निघायला 5.30 वाजले. एक यशस्वी एक ट्रेक पुर्ण केल्याचा आनंद सगळ्या ट्रेकर्सचा थकवा दूर करत होता.
मी घरातून शनिवारी रात्री 11.35 ला निघालो.सगळ्यांना कांजूरमार्गला जमायचे होते. बरोबर 1.15 वाजता कांजूरला पोचलो. तिथून बसने पुण्याकडे प्रस्थान केले. यावेळी 18 जणांचा ग्रुप होता. 18 जणांमध्ये मी, अंकुश, गणेश, अविनाश, स्वागत, रूपेश, कुलदीप, विलास, इशान, रितेश नितेश, हर्शद , विक्रम , आकाश, सचिन, रोहन, प्रदीप इतक्या जणांचा समावेश होता. बस मध्ये बसल्यावर झोपेची आराधना करायला लागलो. ट्रेकला निघालो की ती अशीच रूसून बसते. मग मनवणी शिवाय पर्याय नसतो. काही केल्या झोप येत नव्हती. बस सुसाट पुण्याच्या दिशेने चालली होती.
आम्ही बरोबर 6.30 वाजता राजगडच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे गावात पोचलो. फ्रेश होवून गरम गरम चहा पोह्याचा नाष्टा करून 7.20 ला ट्रेक सुरूवात केली. साधारणपणे राजगडाच्या 'चोर दरवाजात' पोहचायला 2 तास लागतात. पण आम्हाला साडेतीन तास लागले. मोठा ग्रुप असला की सगळ्याना सोबत घेवून ट्रेक करावी लागते. पायथ्यापासून 90% चढाई आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केली. 10 चढाई ही धोकादायक होती. निमुळती वाट त्यात लोखंडी सळ्यांचा आधार घेवून चढाव्या लागणाऱ्या निसर्गनिर्मित पायऱ्या काही मोठ्या, काही छोट्या, कमी अधिक उंचीच्या आव्हानात्मक होत्या. तेही पार करून चोर दरवाजा गाठला. चोर दरवाजातून जेमतेम एक माणूस आत जाईल एवढी जागा होती.
चोर दरवाज्यातून आत आल्यावर खऱ्या अर्थाने राजगडावर पाऊल पडले. परत एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीवर आम्ही दाखल झाले होतो. तिथूनच समोरच लांबवर दिसणारा बालेकिल्ल्याचा सुळका अभेद्धतेची खात्री पटवून देत होता. आजूबाजूचा हिरवाईने नटलेला परीसर त्यात लाल पिवळी रानफुले सौंदर्यात भर टाकत होती. मी जेवढे डोळ्यात साठवता येईल तेवढे साठवत होतो. किल्ल्याचे हजारो वर्षापूर्वी केलेले बांधकाम अजूनही तसेच होते. पदमावती तलावातील पाणी असो वा चौकोनी विहीरीतील पाणी आपला नितळापणा काही सोडत नव्हते. किल्यावर बऱ्याच ठीकाणी अशा पाण्याच्या सुविधा आहेत. थोडे पुढे चालत गेल्यावर पदमावती मंदीराच्या समोर सईबाईची समाधी पाहावयास मिळली. तिथे असलेल्या पारऱ्या चढून आम्ही बालेकिल्या कडे जाउ लागलो पण अगोदर डाव्या बाजूला असलेली सुवेळा माची, हत्तीचा कडा आणि चिलखती बुरूज पाहायचे ठरवले. उजव्या बाजूला संजीवनी माचीकडे जायला वाट होती. शिवाय जवळच पाली दरवाजा आहे जिथून काही ट्रेकर्स चढाई करतात.
१५ ते २० मिनिटे चालल्यानंतर सर्व प्रथम चिलखती बुरूज लागतो. चिलखती बुरूजावरून समोरच्या दिशेला लांबलचक दिसणारी सुवेळा माची आणि दुरवर पसरलेला वेळवंडी नदीवरील भाटघर डँम दिसतो. किल्ल्याच्या तटबंदीला ठीकठीकाणी लहान दरवाजे (चोरवाटा) बांधलेले आहेत पण त्या छोट्याशा दरवाज्यातून बाहेर पडण्यासाठी समोर मात्र दरीशिवाय कोणताही मार्ग दिसत नाही. चिलखती बुरूजाच्या खालच्या अंगाला एका भला मोठा हत्तीच्या आकाराचा खडक आहे आणि मधोमध भले मोठे छिद्र. त्या छिद्रात चार ते पाच माणसे चढून बसू शकतात एवढी जागा आहे. सुवेळा माचीकडून हा कडा हत्तीच्या आकाराचा दिसतो.
हे सगळे डोळ्यात साठवून परत मागे फिरलो. मागे फिरल्यावर डाव्या बाजूला दूरवर संजीवनी माचीचे दर्शन होते. समोरच बालेकिल्ल्याला जायला एक शॉर्टकर्ट वाट आहे. ती वाट आम्ही पकडली. थोडीशी जंगली झाडाझुडपानी व्यापलेली वाट सहज कोणाच्या लक्षात येत नाही.10 मिनटाच्या बिकट वाटेच्या चढाई नंतर गर्द झाडीत घूसलो आणि समोर पाहतो तर निसर्गनिर्मित खडकांची काटकोनापेक्षाही कमी अंशाची चढण. एवढ्या ट्रेक केल्या मी पण त्यावेळी अंगावर सरकन काटा आला. थंड वातावरणात पण घाम फुटला. मी माघार घ्यायची ठरवले. पण एका मित्राने ती चढाई कशी सोपी आहे हे करून दाखवले. भीतीवर मात करायची असेल तर त्या भीतीलाच कवटाळा. तसेच केले. देवाचे नाव घेवून चढाईला सुरूवात केली. माझे एक एक पाउल निर्णाक ठरत होते. 15 मिनिटे अशी चढाई करून आम्ही 18 जणांपैकी 9 जण हा बालेकील्ला चढून गेलो. आमच्यापैकी बाकीच्यानी अगोदरच माघार घेतली होती. बालेकील्ल्याचा दरवाजा आणि त्याचे बांधकाम विचार करायला लावणारे होते. अजूनही उन ,वारा, पाऊस झेलत जशाचे तसे होते. असे काही पाहीले की सगळा क्षीण निघून जायचा. मनाला एक वेगळीच उभारी यायची. बालेकील्ल्यावर इतिहासकालीन 'सदर' , 'राजवाड्याचे अवशेष' आणि इतक्या उंची वर असणारा नितांत सुंदर छोटा तलाव पाहावयास मिळाला. तिथेच बसून आमच्या शिदोऱ्या सोडल्या आणि तोडांत काहीच घास गेले असतील इतक्यात 15 ते 20 माकडांची गँग आमच्या दिशेने यायला लागली. सारे गुंडाळून तिथून पळावे लागले. पण आमच्यापैकी एकजण त्यांच्या ताबडीत सापडला. मोठा गमतीदार आणि तितकाच धोकादायक प्रसंग होता. त्याने आपल्या जवळचा बिस्कीटचा फेकून घेरावातून सोडवणूक केली. काही वेळ मर्कट लिला पाहून खुप मजा आली. आजूबाजूचा परीसर खुप छान होता. सिंहगडाचे पुसटसे दर्शन होत होते. तसेच बालेकिल्ल्यावरून दिसणारा तोरणा पाहून मनात पुढचा बेत तयार होत होता. आठवणींचे गाठोडे मानाशी ठेवून बालेकिल्लाउतरायला सुरूवात गेली.
काही वेळातच आम्ही चोर दरवाज्याच्या इथे पोहोचलो. आमचे बाकीचे मेंबर्स आमचीच वाट पाहत बसले होते. काही वेळ विश्रांती घेवून राजगड उतरायला सुरूवात केली. तासाभराने 3.15 वाजता पायथा गाठला. सगळे मेंबर्स येईपर्यंत तिथून निघायला 5.30 वाजले. एक यशस्वी एक ट्रेक पुर्ण केल्याचा आनंद सगळ्या ट्रेकर्सचा थकवा दूर करत होता.
No comments:
Post a Comment